शबनम न्युज | पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. अशातच शहरात आज काळेवाडी भागात गोकुळ स्वीट जवळ, एकीकडे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाया जात होते. अगोदरच महानगरपालिकेकडून दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना व पिण्याचे पाण्याची टंचाई भासत असताना हे पाणी वाया जाणे म्हणजे एक दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल, सदरचे पाणी हे रस्त्यावर वाहून जात होते. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, व सदर पाईपलाईन दुरुस्त करून घ्यावी, आणि नंतर या सर्व समस्यांचा नागरिकांना त्रास न व्हावा, याकरिता व्यवस्थित उपाययोजना करावी.
तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना पिण्याच्या पाण्याच्या नळकांडातून लोक पाणी भरत आहेत व एकीकडे रस्त्यावर पाणी वाहून जात आहे, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे. रस्त्यावरून येण्या-जाणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज लागली असताना, येथील पिण्याच्या पाण्याच्या नळकांडातून नागरिक हे पाणी घेत आहे. एकीकडे पाणी वाया जात आहे आणि दुसरीकडे पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याने नळकांडातून पाणी घ्यावे लागत आहे. हे सर्व पाहता असे स्पष्ट होते कि प्रशासनाचे शहरातील नागरिकांच्या समस्यांवर लक्ष नाही.
तसेच महापालिकेवतीने दर आठवड्याला शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जनसंवाद बैठक घेतली जाते. या बैठकीत शहरातील नागरिक हे अनेक समस्या मांडतात. या निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येते, असे असताना देखील शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्याने त्रस्त आहे. पालिकेकडून दिवसआड पाणी पुरवठा होत असल्याकारणाने नागरिकांना पाणी पुरत नाही, आणि मग असे प्रसंग देखील पाहायला मिळत आहे. यावरूनच प्रशासनाचे शहराच्या समस्यांकडे लक्ष आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. दर आठवड्याला जनसंवाद बैठक घेऊनही नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही.
पाण्याचा प्रश्न हा नेहमीचा मुद्दा बनला आहे. शहरातील नागरिक ही पाण्याचे वापर व्यवस्थित करत नाही. पाण्याची उलाढाल होताना दिसते, नागरिकांनी देखील पाण्याची बचत करायला हवी. पाण्याची बचत झाल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही. पण प्रशासनाने देखील या सर्व समस्यांकडे लक्ष द्यायला हवे आहे.