शबनम न्युज | पिंपरी
खर तर वेगळ काहीतरी करायचय हे प्रत्येक तरूणाच, साहित्यकाच स्वप्न असत, पण मार्ग सुचत नसतो तसेच नवोदितांना व्यासपीठ मिळत नाही. अश्या असंख्य तरूणांना, कलाकारांना, साहित्यिकांना आपल्या हक्काच व्यासपीठ मिळवून देण्यासाठी झटणारे विजय जायभाये व विशाल सिरसट या युवकांच्या विचारातून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी या संस्थेचा जन्म झाला. बारा लोकांनी लावलेल हे रोपट आज बारा हजारांहून अधिक कलाकार साहित्यकांच आपलं वटवृक्ष झालय.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे । घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।। या विंदा करंदीकरांच्या ओळींप्रमाणे या तरुणांने साहित्य सेवेचा वसा हाती घेतला, या साहित्यिक व सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक जिल्हात कवी संमेलन, सामाजिक उपक्रम उत्कृष्ट पणे पार पडत आहेत. सोलापूर मधील गावांमध्ये ग्रामीण वाचनालय ही संस्थेने सुरू केले आहेत प्रत्येक जिल्ह्यात या संस्थेच्या जिल्हा समित्या काम करत आहेत. फक्त महाराष्ट्र नव्हे तर देश परदेशातील कवी या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. या साहित्यिक कामात विजय जायभाये व विशाल सिरसट यांना पुढे शिल्पा मुसळे, सुमंत पाटील, चैताली कापसे, छाया देसले, वीणा पाटील, श्वेता देशपांडे, वैशाली पडवळ, श्वेता खोंडेकर, अजयकुमार वंगे अश्या शेकडो साहित्यिकांनी साथ दिली.