शबनम न्युज | पुणे
पुणे शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहतुकीची रेलचेल अति प्रमाणात वाढलेली आहे. परंतु वाहतूक सुरळीत व्हावी, याकरिता जे नियम शासनाच्या वतीने लागू केले आहेत, त्या नियमांची पायमल्ली सर्रास पुणे शहरात दिसत आहे. याची प्रचिती आज झालेल्या एका घटनेवरून प्रामुख्याने दिसून येते. पुणे शहरातील औंध येथे बस स्टॉप आहे. या बस स्टॉप जवळ एक पदचारी गृहस्थ रस्ता ओलांडत असताना, एका अज्ञात भरधाव चार चाकी वाहनाने या गृहस्थाला जोरदार धडक दिली. या धडकेत पदचारी इसमाला जबर मार लागला. परंतु चार चाकी चालविणारा चालक हा ज्या भरधाव वेगाने आला त्याच भरधाव वेगाने पुढे गेला. आपल्या चार चाकी वाहनाने धडक बसली, सदर इसम खाली पडला हे सगळं माहीत असतानाही चार चाकी वाहन चालक हा निर्धास्तपणे पुढे निघून गेला. अशा वाहन चालकांना शिक्षा व्हायलाच हवी, त्यांना दंड व्हायलाच हवा, अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये होत आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु वाहतूक नियम पाळले जात नाही, याची प्रचिती या घटनेतून दिसते. अशा घटना वारंवार शहरात घडत आहेत. शासनाने या अपघात घडविणाऱ्या घटनांमध्ये जे दोषी आहेत, त्यांना शिक्षा द्यावी, दंड आकारावा व वाहतूक सुरळीत नियमित व्हावी, यासाठीही प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांना जबाबदार कोण? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.