शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध ‘सूड’ घेतल्याचे वक्तव्य केल्यांनतर ‘फडणवीस सारख्या उंचीच्या नेत्याने स्वत:लाच कमी लेखले, हे दुर्दैवी’ असल्याची टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.
ते म्हणाले, “महाराष्ट्रात सूडाच्या भावनेवर राजकारण केले जात नाही. नवनवीन पूर्वापार परंपरा रचल्या जात असतील तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. राजकारणात मतभिन्नता सामान्य आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत कोणीही बदला हा शब्द वापरला नाही. अशा राजकारणाचा अवलंब करून फडणवीसांनी स्वत:चीच उंची कमी केली आहे, ही दुर्दैवी बाब आहे, असे राऊत म्हणाले.
मंगळवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीदरम्यान, फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर विश्वासघात केल्याबद्दल हल्ला करण्यासाठी शब्दही सोडले नाहीत तसेच “जर कोणी माझा विश्वासघात केला तर मी त्याचा बदला घेईन. होय, मी बदला घेतला आहे” असे वक्त्यव्य फडणवीस यांनी केले होते.