शबनम न्युज | मुंबई
भारत जोडो यात्रेत व्यस्त असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दूरध्वनीद्वारे विचारपूस केली. दरम्यान, हे माणुसकीचे कृत्य असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, भारत जोडो यात्रेत व्यस्त असूनही राहुल गांधी यांनी माझी दूरध्वनीद्वारे विचारपूस केली. राहुल गांधी म्हणाले कि, आम्हाला तुमची चिंता होती.
भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन
माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा
ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..Advertisement— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2022
राऊत म्हणाले, ११० दिवस तुरुंगात घालवलेल्या एका राजकीय सहकाऱ्याच्या वेदना जाणवण्याच्या त्यांच्या सहानुभूतीची मी प्रशंसा करतो, राजकीय कटुतेच्या काळात असे हावभाव दुर्मिळ होत आहेत. राहुलजी त्यांच्या यात्रेत प्रेम आणि करुणेवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. असे राऊत यांनी म्हंटले आहे. पुढे ते म्हणाले, राहुल गांधी हे असेच एक व्यक्ती आहेत जे वैचारिक आणि राजकीय मतभेदांविरुद्ध मित्र बनून राहतात. माझे भाजपमध्येही मित्र आहेत, पण मी तुरुंगात असताना ते आनंदी होते, हे मुघल काळातील राजकारण आहे अशी टीका ही राऊतांनी यावेळी केली.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2022