शबनम न्युज | मुंबई
शिवसेनेचे नेते, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी भावनिक पत्र लिहिले आहे. तसेच, गेल्या ३ वर्षांच्या कार्यकाळात आपण वरळीचा चांगला विकास केल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी पात्रात म्हंटले आहे कि, ‘महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत. या ३ वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे. आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी A+’ चे वचन दिले होते. गेल्या ३ वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत, असे आदित्य यांनी पत्राच्या पहिल्याच पॅरामध्ये म्हटले आहे.
नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो, किंवा सामुदायिक स्तरावर व वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राइव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत. म्हणूनच राजकीयदृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखिल वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना देखील वरळीत यावस वाटतंय, असंही आदित्य यांनी पत्रात म्हटलं आहे.