शबनम न्युज | पिंपरी
नेहरूनगर, विठ्ठल नगर झोपडपट्टी परिसरात महानगरपालिकेचे विजेचे खांब अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये असून कोणत्याही क्षणी ते पडून नागरिकांचा, लहान मुलांचा, वयोवृद्ध नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे दिसून आले. सदर परिस्थिती परिसरातील राहुल वाघमारे आणि नागरिकांनी छावा ब्रिगेड संघटना अध्यक्ष अभय दादा भोर यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. तसेच सदर विजेचा खांब न हटविल्यास छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभयदादा भोर यांचा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सदर ठिकाणी मातीची घरे असून त्या घरांमध्ये अनेक लहान मुले वयोवृद्ध माणसं निवास करतात परंतु या ठिकाणी असलेले विजेचे खांब अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये असून येथील नागरिक जीव मुठीत घेऊन वावरताना दिसून आले पावसाळ्यात तर येथील नागरिकांना घरामध्ये राहणे सुद्धा मुश्किल होते कारण कोणत्या वेळी हे खांब घरांवर पडून अपघात होतील हे सांगता येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
महानगरपालिकेचे दुर्लक्ष स्मार्ट सिटी करत असताना झोपडपट्ट्यांकडे महानगरपालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष होत असताना दिसून येते आहे महानगरपालिका आणि महावितरन विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष दिसून येत असून काही गंभीर दुर्घटना घडल्यास संबंधित विभाग जबाबदार धरले जातील एवढी गंभीर परिस्थिती असताना ज्यावेळी अपघात होतील त्यावेळी शासनाला जाग येईल त्वरित परिसरातील धोकादायक काम विजेच्या तारा दुरुस्त न झाल्यास छावा ब्रिगेड संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येऊन महावितरण आणि महानगरपालिका विद्युत विभाग अधिकाऱ्यांना गैरव घालण्यात येणार असल्याचे छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय दादा भोर यांनी आज प्रसिद्धी पत्र द्वारे सांगितले.