शबनम न्युज | नाशिक
दिल्ली मध्ये झालेल्या श्रद्धाच्या हत्याप्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हंटले जात आहे व राज्यात अनेक ठिकाणी हिंदूत्ववादी संघटनांकडून याविरोधात मोर्चे ही काढले जात आहेत. असाच मोर्चा नाशिकमध्ये काढण्यात आला होता. त्यानंतर आज त्र्यंबकेश्वरमध्येही हा मोर्चा काढण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये असताना, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त दिली. “मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. यात जात धर्म न आणता देशातील प्रत्येक कन्येचं रक्षण झालं पाहिजे, अशी भूमिका घेतली पाहिजे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.
ते म्हणाले, “या विषयावर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. ही प्रकरणं लव्ह जिहादची आहेत की वेगळं काही आहे यामागे हे तपासावं लागेल. आफताबने केलेली श्रद्धाची हत्या अतिशय निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झाले आहेत आणि अनेक मुलींना धमक्याही देण्यात आल्या आहेत.” असे ही यावेळी संजय राऊत म्हणाले.