शबनम न्युज | पिंपरी OKBET/a>
“राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दोनदा अपमान केला, त्यांची हिंमत होतेच कशी? राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा, अन्यथा महाराष्ट्र बंद होईल असा”, इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन सुरू असताना बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध करीत आज विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी बंद पुकारण्यात आला. या बंदला पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. okbet league of legend betting
OKBET/a>
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले कि, बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणारा हा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अवमान केला जात आहे. राज्यपालांनी एकदा नव्हे तर दोन वेळा असे केले, त्यामुळे वेळ आली आहे ॲक्शन घेण्याची. राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा, अन्यथा महाराष्ट्र बंद होईल. महाराष्ट्र हे इतर राज्यांना दिशा देणारे राज्य आहे. शिवरायांनी इतिहास घडवला. मात्र, महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांबाबत आपण चर्चा करत बसलोय. त्यामुळे आपण एकत्र येऊन आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची गरज नाही का? म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये हे आंदोलन होत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.okbet sports betting