okbet motor sports betting
okbet betting offer world cup
शबनम न्युज | पुणे
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावर राज्यात संताप व्यक्त केले जात आहे. याचा राग मनात धरून काल काही कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. त्यानंतरच आता, रयत शिक्षण संस्थेनेही चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे.
रयत शिक्षण संस्थेकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. “चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे” अशा शब्दात संस्थेनं निषेध केलाय.
संस्थेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, “महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर-गरीब, डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना १०३ वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मवीरांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. किलोस्कर, ओगले, कूपर या कंपनीमध्ये कर्मवीरांनी जे काम केले त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातील उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स, आई- वडीलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोने, मंगळसूत्र सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च केले.
विद्यार्थ्यांनी भीक मागून शिकण्यापेक्षा स्वावलंबनाने, स्वकष्टाने आपले शिक्षण पूर्ण करावे हे कर्मवीरांचे शैक्षणिक तत्वज्ञान होते. यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका ही अभिनव योजना राबविली. आज या योजनेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. म्हणूनच स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे कर्मवीरांनी संस्थेचे ब्रीद घेतले.
कर्मवीरांच्या या कार्याला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकसहभागातून ही शैक्षणिक चळवळ अधिकाधिक व्यापक केली. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या माध्यमातून कोट्यावधी मुलांना शिक्षण मिळाले. आज महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर दिसतो आहे त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे हे तत्वच कारणीभूत आहे असे म्हटले तर अनुचित ठरणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज हे कर्मवीरांचे आदर्श होते. याच कालखंडात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा कर्मवीरांना मोठे सहकार्य लाभले. म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले.
या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान अत्यंत दुर्देवी आहे. त्यांचा संस्थेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.” अशा शब्दात संस्थेने निषेध नोंदवला आहे.
https://twitter.com/amolmitkari22/status/1601627168987303936?s=20&t=x1G3gHGpVWZ96HuGEiv2XAOKBET BOXING ODDS
okbet betting