- पक्षात येणा-या चुकीच्या लोकांना वेळीच अटकाव घातला पाहिजे – अनुप मोरे
- बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांना मेळाव्यात केले मार्गदर्शन
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
शहर भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक १५ प्राधिकरण येथे बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्ता मेळाव्याचे बुधवारी (दि. १४) रोजी आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यास भाजप शहराध्यक्ष तथा आ. महेशदादा लांडगे, आ. उमाताई खापरे, मा. खा. अमर साबळे, राज्य प्रदेश प्रवक्ता एकनाथ पवार, मा. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, पिं. चिं. नवनगर विकास प्राधिकरणाचे मा. अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस आणि युवा वॉरियर्स प्रदेश संयोजक अनुप मोरे, मा. उपमहापौर शैलजाताई मोरे, मा. महापौर आर. एस. कुमार, विजय शिनकर, राजेंद्र बाबर, वृषालीताई, सलीम शिकलगार, अरुण थोरात, समीर जावळकर, सचिन कुलकर्णी, मनोज देशमुख, अतुल इनामदार, शर्मिला बाबर, सुसंगती ज्येष्ठ नागरिक संघ, एकता ज्येष्ठ नागरिक संघ, संत तुकाराम उद्यान हास्य योग, माऊली ज्येष्ठ नागरिक संघ, दादा दादी ज्येष्ठ नागरिक संघ, सुवर्णयुग तरुण मंडळ, सिंधूनगर युवक मित्र मंडळ, माजी सैनिक संघटना, जिव्हाळा महिला बचत गट महासंघ, मधुश्री कला अविष्कार, लायन्स क्लब निगडी, स्माईली ग्रुप- गणेश तलाव, प्राधिकरण रिक्षा संघटना, विवेक मित्र मंडळ, रस्टन कॉलनी हौसिंग सोसायटी,मधील सदस्य व सर्व बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. महेश लांडगे म्हणाले, महापालिकेची प्रभाग रचना करताना विरोधकांनी बहुतांशी प्रभागाची मोडतोड केली. चारचा प्रभाग अनुकूल वाटत नव्हता म्हणून त्यांनी तीनचा प्रभाग केला. त्यातही प्रभागाचा बराचसा भाग त्यांनी वगळला. नागरिक आपल्याला मतदान करणार नाहीत याची विरोधकांना बहुदा भीती वाटत होती. विरोधकांमध्ये निवडून यायचा विश्वासच नव्हता. तसे करूनही त्यांचा विश्वास शहरातील लोकांनी चुकीचा ठरवला असता. सत्ता गेल्यानंतर आता कुणीही उठून आरोप करतो. त्याला आधार नसतो. केवळ चर्चेत रहाण्यासाठीच खटाटोप सुरु आहे. सत्ता बदलल्यानंतर गेल्या तीन महिन्यात लोकांची वाटणारी काळजी त्यांना मागच्या अडीच वर्षात वाटली नाही. गेल्या वीस वर्षात सत्तेवर असताना विरोधकांनी वाढत्या लोकसंख्येनुसार शहराच्या विकासाचे नियोजन केले नाही. त्यामुळे आज लोकांना पाण्याची, वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे सुविधांवर ताण येत आहे. मी आरोप-प्रत्यारोप न करता काम करणारा माणूस आहे. आमच्याकडे कामे आहेत ती बोलतात. आम्हाला कुण्याच्या विरोधात बोलायची गरज नाही. जो काम करतो त्याची बदनामी होतेच. भाजपचे केंद्र, राज्य आणि पालिकेचे काम यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणासाठी शहर सोडून पुण्यात शिकायला जातात. तत्कालीन प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे आणि मी पुण्यातील मोठी महाविद्यालये आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञांची बैठक घेतली होती. बैठकीत प्राधिकरणाची जागा उपलब्ध करून परिसरात एजुकेशन हब स्थापन करण्याचा संकल्प केला होता. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी (सिओइपी) सारखे महाविद्यालय आम्ही शहरात आणले.
प्रास्ताविक करतानाअनुप मोरे म्हणाले, गेल्या बावीस वर्षांपासून मी पक्षाचे काम प्रामाणीकपणे करतोय. वार्ड अध्यक्ष ते भाजप पदाधिकारी या काळात नागरिकांनी मला प्रेम आणि आशीर्वाद दिले. त्यामुळे भाजप हा येथील नागरिकांचा परिवार आहे. प्रभागातील ५२ बूथ पैकी ४२ बूथ प्रमुखांना ओळखपत्र दिले आहे. विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. प्राधिकरणातील नागरिक केवळ भाजपसाठीच बाहेर पडतात. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळवून देऊ. भविष्यात प्रभागातून चुकीचे लोक पक्षात येऊ शकतात, त्यांना अटकाव केला पाहिजे. २०१७ च्या निवडणुकीत तीनचा प्रभाग असता तर विरोधी पक्षाचे दोन विद्यमान नगरसेवक पराभूत झाले असते. भविष्यात आम्हाला पक्षाकडून पूर्ण ताकद हवी. नवीन उमेदवार न देता आहेत तेच उमेदवार कायम ठेवा म्हणत उपस्थितांचे आभार मानले.
मा. खा. अमर साबळे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. समीर जावळकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.