शबनम न्यूज वृत्तसंस्था :
महाराष्ट्रात औरंगाबाद या शहराचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद या शहराचे नाव धाराशिव करण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे महाविकास आघाडीने यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी या शहरांचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला व निर्णयाला काल केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले व महाराष्ट्रातीलच अहमदनगर या शहराच्या नामांतराची ही मागणी केली आणि अहमदनगर चे नामांतर अहिल्यानगर करावे असे ट्विट केले. तसेच अहमदनगरचे नाव अहिल्यानगर हे देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वातच होणार असल्याचा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा.@Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात होणारच.@BJP4Maharashtra @mieknathshinde
Advertisement— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 25, 2023