शबनम न्युज | पुणे
आज पासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 15 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आज दहावीची परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने ही अनेक परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यामध्ये पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वकांक्षी असते. प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्या पेपरला धाकधूक असते. या संपूर्ण वातावरणात विद्यार्थी आपली परीक्षा देत असतो. आजपासून सुरू झालेल्या या दहावीच्या परीक्षा 23 मार्चपर्यंत चालणार आहेत. शालेय प्रशासनाच्या वतीने परीक्षेसाठी लागणारी व्यवस्था परिपूर्णपणे करण्यात आली आहे.
Advertisement