शबनम न्युज | मुंबई
बारसू रिफायनरी साठी उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिले होते आणि आता तेच विरोध करत आहे, हा दुटप्पीपणा असल्याची टीका राज्याचे मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. सद्यस्थितीत बारसू रिफायनरीबाबत सगळे गैरसमज पसरवले जात आहे. सकाळपासून सगळी परिस्थिती बघत असून प्रसारमाध्यमांबाबत आम्हाला आदर आहे. बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प असून, यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यामुळे हा प्रकार सुरू आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, नाणार प्रकल्प रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसू मध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी दिले होते. साडेनऊचा इव्हेंट करणारे म्हणतात की, रिफायनरी होणार नाही, एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.