शबनम न्युज | दिल्ली (वृत्तसंस्था)
“आज मन की बात हे एक जनआंदोलन बनले आहे. मग बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रम असेल, स्वच्छता आंदोलन असेल, खादी प्रेम असेल किंवा निसर्गाची गोष्ट वा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव असेल. जे विषय मन की बात कार्यक्रमात आला तो जन आंदोलन बनला,” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. आज मन की बात या कार्यक्रमाचा ऐतिहासिक १०० वा भाग प्रसारित झाला. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी पुढे म्हणाले, या कार्यक्रमाने मला तुमच्यापासून दूर होऊ दिले नाही. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा लोकांशी भेटीगाठी व्हायच्या. मात्र जेव्हा २०१४ मध्ये मी दिल्लीला आहो. तेव्हा येथील जीवन खूप वेगळं असल्याचं माझ्या लक्षात आलं. जबाबदाऱ्या वेगळ्या, सुरक्षेची व्यवस्था, वेळेची मर्यादा, सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप वेगळं वाटायचं. ५० वर्षांपूर्वी मी माझं घर यासाठी सोडलं नव्हतं की, एके दिवशी माझ्याच लोकांपासून कठीण होईल. जे देशवासी माझ्यासाठी सर्व काही आहेत. मी त्यांच्यापासून दूर राहून जगू शकत नव्हतो. मन की बात या कार्यक्रमाने मला या आव्हानाचं उत्तर मिळवून दिलं. त्यातून सामान्य जनांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. पदभार आणि प्रोटोकॉल, व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि जनभाव, कोट्यवधी लोकांसह माझ्या भावविश्वाचा अतूट भाग बनला.
'Mann Ki Baat' is an excellent platform for spreading positivity and recognising the grassroot changemakers. Do hear #MannKiBaat100! https://t.co/aFXPM1RyKF
— Narendra Modi (@narendramodi) April 30, 2023