शबनम न्युज | मुंबई
आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचे विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत चालल्या आहेत. त्यामध्ये आता शरद पवारांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावरून कार्यकर्ते उपोषणास देखील बसले आहेत. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आता देश ज्या परिस्थितीतून त्याकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याचा आपल्या सर्वांकडून सुरू आहे. अशावेळी शरद पवार यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे त्यांना राजकारणातून बाजुला जाऊन चालणार नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.