देशभरात ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्षांनी आणि इतर संघटनाने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती, पण अखेर शुक्रवारी (दि. ५) रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यानंतर तमिळनाडू मध्ये मल्टीफ्लेक्स असोसिएशन चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. त्यानंतर आता पश्चिम बंगाल मध्ये ही या चित्रपटावर बंदी टाकण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच ही कारवाई केली आहे.
द केरळ स्टोरी या चित्रपटामुळे संपूर्ण देशात वादविवाद निर्माण होत आहेत. एकीकडे बॉलीवूडची प्रसिद्ध निर्माता विपुल अमृतलाल शहा यांचा द केरळ स्टोरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे, तर दुसरीकडे अनेक स्तरातून, राज्यातून या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील या चित्रपटावर बंदी टाकली आहे.