मुंबई : शबनम न्यूज
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्या उच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता सांगण्यात येत आहे सत्ता संघर्षाचे भविष्य ठरविणारे न्यायाधीश उद्या कोणता निकाल देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे उच्च न्यायालयाचा निकाल काय येतो याची शिवसेनेचे ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात धाकधूक वाढली आहे.
उद्याच्या निकालामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण बदलणार असल्याचेही बोलले जात आहे सत्ता संघर्षावर उच्च न्यायालयात मागील नऊ महिन्यापासून सुनावणी होत आहे ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सत्ता संघर्षाचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात असतानाच आता हा निकाल उद्या लागणार, जर निकाल हा शिंदे गटाच्या विरोधात गेला तर 16 आमदार अपात्र ठरतील असे बोलले जात आहे त्यामुळे महाराष्ट्र चे सरकार कोसळणार असेही सांगण्यात येत आहे उद्याच्या सत्ता संघर्षाच्या निकालावर विविध पक्षांच्या नेत्यांच्या वतीने विविध अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत
उद्याच्या सुनावणीवर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीससरकार कोसळू शकतं, असं जाणकार सांगतात. तर सरकारच्या बाजूने निकाल आल्यास येत्या चार दिवसात राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्याचा कौल कुणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या शिवाय कोर्टाकडून येणारा निकाल हा ऐतिहासिक ठरणार आहे. या निकालावर शिवसेनेचं अस्तित्वही अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे.