शबनम न्युज | मुंबई
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या प्रतिक्रियामध्ये त्यांनी आपण तेव्हाचा राजकीय पक्ष कोणाच्या ताब्यात होता, व्हीप कोण होता, आदिसह शिवसेनेचे संविधान तपासणार असल्याचे म्हटले होते. यावरून राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
ते म्हणाले, ज्या पदावर ते आहेत, सुप्रीम कोर्टाचे म्हणणे त्यांचे म्हणणे, या दोन्ही गोष्टींमध्ये विरोधाभास आहे. कोर्टाने स्पष्टपणे तुम्हाला मर्यादा आहे असे म्हटले होते. कोर्टाने पक्षातील फूट नाकारली आहे, ते नाही म्हटल्यावर काय उरते, असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.
तसेच राजकीय पक्षांनी नेता आणि व्हीप नेहमी अपेक्षित आहे. हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, कोण राजकीय पक्ष होता? महाराष्ट्राला मूर्ख समजता का? शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे फेब्रुवारीमध्ये गेला. 22 जुलैला त्यावरून निर्णय कसा लावणार असा सवाल केला, तर मला आश्चर्य वाटते त्यांच्यासारखा सुरक्षित चतुर असे कसे काय बोलू शकतो? हे रुल बुक आहे. नार्वेकर तर मोठे वकील आहेत, आम्ही अनपढ आहोत, अशी टीका आव्हाड यांनी केली.