शबनम न्युज | मुंबई
शिवसेनेचे (ठाकरे गट) बीड जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी ठाकरे गटाच्या उपनत्या सुषमा अंधारेना दोन चापट्या मारल्याचा दावा केला होता. तसेच गंभीर आरोप देखील केले होते. यानंतर आता स्वतः सुषमा अंधारे यांनी या घटना क्रमांकावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच खरच त्यांना मारहाण झाली का? यावर स्पष्टपणे भूमिका व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या, “सुषमा अंधारेंवर हात उचलला असं म्हटल्यावर गोंधळ होऊ शकतो, म्हणून आप्पासाहेब जाधवांनी तसा दावा केला असावा. एखादा माणूस समोर येऊन स्वतःच सांगतो की मी हाच उचलला. याचा अर्थ निश्चितपणे त्याच्या मनात असं काही करण्याचा विचार असू शकतो.” असे त्या म्हणाल्या.
तसेच तुम्हाला मारहाण झाली का? यावर सुषमा अंधारे स्पष्टपणे म्हणाल्या, नाही. मला मारहाण झाली असती तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का. हे प्रकरण आतापर्यंत थांबलं असतं का. हा दावा करून त्यांना गोंधळ तयार करायचा आहे. यातून आमचं सभेवरील लक्ष विचलित व्हावं असं त्यांना वाटतं. “काल तो माणूस ज्या आवेशात येऊन बोलला त्यावरून निश्चितपणे शिंदे गटाकडून किंवा शिवसेना पुन्हा उभी राहू नये असं वाटतं त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे,” असंही सुषमा अंधारेंनी नमूद केलं.