शबनम न्युज | मुंबई
सध्या परिस्थिती महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपात्रतेचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे आलेत, अशावेळी शिवसेना ठाकरेंची असो वा एकनाथ शिंदे यांची नजीकच्या काळात त्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे हे दोघेही एकत्र येऊ शकतात, असा मोठा दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.
ते म्हणाले, शिवसेनेच्या सर्व 54 आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी आमदार अपात्र होणार आहेत. अपात्रतेची कारवाई केवळ या टर्मपूर्ती नसते तर पुढील सहा वर्षांसाठी असते, त्यामुळे आमदारांचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे. अपात्र व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही, हा नियम राज्यसभा खासदारांसह सर्वांना लागू आहे, असेही ते म्हणाले.