शबनम न्युज | मुंबई
मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही, भारतीय जनता पक्षाने पाळलेला तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचा खुराडा असतो, ते कधीही कापले जातात. तो पक्ष नाहीच, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटासह भाजपवर टीका केली.
ते म्हणाले, शिंदे गटाला लोकसभेच्या 5 जरी जागा भाजपने दिल्या तरी भरपूर आहेत. मागच्या लोकसभेमध्ये आमचे 19 खासदार होते, आमचा हा आकडे लोकसभेत कायम राहील. शिंदे गटाने 48 जागा लढवायला पाहिजे, असा टोला ही संजय राऊत यांनी लगावला आहे.
नव्या संसद भवनाच्या निमंत्रण पत्रिका बघितली तर उपराष्ट्रपतींचे नाव सुद्धा नाही, राष्ट्रपतींना निमंत्रण द्या, राष्ट्रपतींना का नाही बोलावलं? त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. हा कुठलाही खाजगी कार्यक्रम नाही, हा देशाचा कार्यक्रम आहे,. राष्ट्रीय कार्यक्रम आहे, पंतप्रधानांनी समोर येऊन या संदर्भात बोलले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.