शबनम न्युज | पुणे
अल्पसंख्याक समाजातील गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्या, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपर्यंत असणे गरजेचे आहे. यावर्षी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 30 मे पर्यंत असून, यापूर्वी दोनदा मुदत वाढविण्यात आली असल्याने यापुढे मुदत मिळते की नाही याबाबत अनिश्चितता असल्याने पालकांनी वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये तर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापर्यंत असावे, या योजनेत फ्री शिपची सवलत मिळत असते, यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा, विद्यार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध या प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.