शबनम न्युज | मुंबई
काल अजित पवार आणि संजय राऊत या दोघांमध्ये उत्तर आणि प्रत्युत्तर याची स्पर्धा चालू होती. यामध्ये अजित पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी कडक शब्दात उत्तर दिले होते. धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे, असे सांगत राऊतांनी अजित पवारांवर प्रहार केला होता. त्यावरून आज संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, अजित पवारांबद्दल मला अर्धवट माहितीवर प्रश्न विचारला. अजित पवार असे बोलले नव्हते, माझा आणि अजित पवारांचा स्वभाव सारखा आहे. फार पटकन वेळात रिऍक्ट होतो. महाराष्ट्र संयमाने वागले पाहिजे, बोलले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. पण त्यापुढे संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. त्यांची जीभ दाताखाली आली म्हणून ते थुंकले असे त्यांनी सांगितले. पण पत्रकारांनी अर्धवट माहितीवर प्रश्न विचारला त्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्दात उत्तर दिले. मला त्याचा खेड वाटतो, मी असे बोलायला नको होते असे त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही सगळे सहकारी आहोत. पवार कुटुंबाशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. अजित पवार हे मविआचे प्रमुख नेते आहेत. जोपर्यंत संपूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही हे मी ठरवले आहे असं स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी दिले आहे.