(पिंपरी ) बोढार, नांदेड येथे आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव व रेणापूर, लातूर येथील गि्रिरत्न तबकले यांची हत्या करण्यात आल्या, राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून शेवगाव, अकोला कोल्हापूर येथे धार्मिक दंगली झाल्या आहेत, या सगळ्या घटना राज्य सरकार प्रयोजित आहे तसेच राज्यात गुन्हेगारावर कायद्या चा वचक राहिला नाही खोके सरकार शह. कटशहा च्या राजकारणात मशगुल असून सामान्य जनतेचा ह्या सरकार वरून विश्वास उडाला आहे,
गृह मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी झाले आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाने निषेध आंदोलना त ह्या खुणातील आरोप्याना कडक शिक्षा मिळावी देवेंद्र फडणवीस च्या राजिनाम्या ची मागणी करण्यात आली.
सदर आंदोलनात शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे,अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग संजय औसरमल, सामजिक न्याय महिला अध्यक्ष गंगा धेंडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मोहंम्मद पानसरे, ॲड. गोरक्ष लोखंडे, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस मयूर जाधव, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष बाळासाहेब भालेराव, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, देवेंद्र तायडे, सचिन वाल्हेकर, कुमार कांबळे, आकाश कडलक, सागर कसबे, अनिल औसरमल, लता ओव्हाळ, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, विजया काटे, निर्मला मोहन यादव,नीलम कदम, राज हसतोडिया, पदवीधर सेल अध्यक्ष माधव पाटील, रामकिसन माने,उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, बाळासाहेब पिल्लेवार, विजय दळवी, महेश माने, सरचिटणीस राजन नायर,सुरेखा ताई नवनाथ कांबळे,अंजु रामा चौधरी,अनुसया हजारे,विजया शिंदे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.