शबनम न्युज | पिंपरी
दिल्ली येथील माजी सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम हे दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन राणी झाँसी रोड याठिकाणी विजया दशमी निमित्त बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आयोजित धम्म दीक्षा सोहळ्यात सहभागी झाले होते. त्याठिकाणी त्यांनी १०००० पेक्षा जास्त बौद्ध बांधवांसह विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला दिलेल्या २२ प्रतिज्ञेचे सामुदायिक वाचन केल्याने भाजपलने त्यांना लक्ष करत पोलिस उपायुक्त पहाडगंज यांच्याकडून चौकशी प्रकरणी नोटिस बजावन्यात आली. अशा वेळी आम आदमी पार्टीने राजेंद्र पाल गौतम यांच्यासोबत भक्कम पणे थांबण्याची अपेक्षा असताना याउलट राजेंद्र गौतम पाल यांच्याकडून सामाजिक न्याय मंत्री पदाचा राजीनामा घेतला . ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि असांविधानिक असल्याचे जाहीर करत आज पिंपरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे कार्यकर्ता आंबेडकर विचारांचा व समस्त बौद्ध समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी आंदोलनात बोलत असताना प्रमोद क्षिरसागर म्हणाले की, “२२ प्रतिज्ञा देणे म्हणजे कोणत्याही देवी देवतांचा अपमान नसून मूर्तिपूजा, कर्मकांड, चमत्कार यातून समजाला सोडवण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेली शपथ होती. बाबासाहेबांनी या सर्व गोष्टींचा फोलपणा जाणला होता. लोकांना चांगले जिवन जगता यावे यासाठीची केलेली ही कृती होती.आपला धर्म आपली जात धोक्यात आहे अस भासवून ठराविक धर्माच्या लोकांना मतांसाठी आकर्षित करण्याचा प्रकार चालू आहे.२२ प्रतिज्ञांना विरोध म्हणजे सरळ सरळ संविधानाला आव्हान देण्यासारखे आहे”
धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले” की नागपूर दीक्षाभूमी येथे भाजप चे उपमुख्यमंत्री उपस्थित राहतात त्याला भाजप विरोध करत नाहीत तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा घेणाऱ्या सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र गौतम पाल यांना विरोध करतात ही भाजप आणि आप ची धर्मांधता दर्शवते धार्मिक तेढ निर्माण करून राजकारण करणं हा भाजपचा उद्देश असल्याचे दिसून येते ,आप ने राजेंद्र गौतम पाल यांचा राजीनामा स्वीकारून धर्मनिरपेक्षतेचे घेतलेले सोंग दिसून येते”
सूरज गायकवाड यांनी निषेध नोंदवत असताना आपल्या भाषणात म्हणाले की,” २२ प्रतिज्ञा ही संविधानानुसार आम्हा बौद्ध धर्मीयांची अस्मिता आहे सन १९५६ पासून आम्ही २२ प्रतिज्ञांचे पालन करीत आहोत.बीजेपी आणि आम आदमी पार्टी च्या या मनुवादी कृतीचा आम्ही निषेध व्यक्त करतो”. सदर आंदोलनात रहीमभाई सय्यद, विनोद गायकवाड, राजन नायर, शिवशंकर उबाळे,संतोष शिंदे. यांनीही आपली भूमिका मांडली. यानंतर सामुदायिक २२ प्रतिज्ञांचे पठण करण्यात आले.
यावेळी गौतम पटेकर,नरेंद्र सोनटक्के, प्रबुद्ध कांबळे,युवराज भास्कर तिकटे, चंद्रकांत सोनवणे, विकी पासोटे, सतीश कदम, अजय गायकवाड,आदर्श वाघमारे, पंकज हुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.