शबनम न्युज | मुंबई
आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी चागंलं काम करत आहे. मै अभी कॅबिनेट से कम नही हूँ, बच्चू कडू अकेलाही काफी है सबके लिए. मला मंत्रीपद दिलं तरी चांगलं आणि नाही दिलं तरी त्यापेक्षा चांगलं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर दिली आहे.
आज राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. एकनाथ शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.
Advertisement