शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव या ठिकाणी बी.बी.ए.( सी.ए ) शाखेच्या वतीने Induction (प्रेरण) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना बी.बी.ए.(सी.ए.) शाखेचे विभाग प्रमुख प्रा.शाहूराज येवते यांनी शाखेचे महत्व अधोरेखित करीत या शाखेला स्पर्धेच्या युगात किती महत्वाचे स्थान आहे याबाबत सविस्तर विवेचन केले.
यावेळी प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचा परिचय व महाविद्यालयाचा चढता आलेख सविस्तर मांडला तसेच बी.बी.ए. (सी.ए.) शाखेचा परिचय प्रा.प्रेरणा पाटील यांनी करून दिला तर प्राचार्यांचा परिचय प्रा. सोनाली तापकीर यांनी करून दिला आणि सर्व उपस्थित विद्यार्थी व सहाय्यक प्राध्यापक यांनी आपला परिचय करून दिला तसेच महाविद्यालयात असणारे विविध विभाग व मंडळाचे विभाग प्रमुख यांनी पुढील प्रमाणे परिचय करून दिला. परीक्षा विभाग – प्रा संजीव कांबळे, स्पर्धा परीक्षा विभाग-प्रा.माणिक कसाब,विद्यार्थी विकास मंडळ-प्रा. शाहूराज येवते, उद्योजकता मार्गदर्शन विभाग – प्रा.डॉ. राजू शिरसकर, क्रीडा विभाग – प्रा. विकास दिघे व शिष्यवृत्ती विभाग – सुशेन राठोड. या कार्यक्रमध्ये अध्यक्षिय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी हा वेली सारखा असून प्रत्येक विद्यार्थ्यांने स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशी गरुड झेप घेतली पाहिजे यासंदर्भात मत व्यक्त करीत आजचे युग हे डिजीटल युग व संगणक युग असून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार योग्य क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले. ज्या विभागात प्रात्यक्षिक जास्त व थेअरी कमी तो विभाग नेहमी हसता -फूलता राहतो असे मत व्यक्त करीत आधुनिक काळात वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा व आरोग्याची काळजी किती महत्वाची असून संवेदनशील, स्वातंत्र्य -समता- बंधुत्व व शांतता या मूल्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी नेहमी कार्यरत राहणे व प्रामाणिकपणा अंगी जोपासणे भविष्याच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचे आहे याबाबत मत व्यक्त केले. विश्वासाने मैत्री निर्माण होते, व्यायामाने आरोग्य चांगले राहते, मनशांती मुळे समृद्धी प्राप्त होते तर इमानदारी मुळे शांत झोप लागते या तत्वांची तरुणाईला कशी आवश्यकता आहे याबाबत सविस्तर मत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला प्रा. कैलास अस्तरकर प्रा परमेश्वर भत्ताशे , प्रा. यशोदा खुळखुळे प्रा. सविता मानके प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा दिलीप बारी, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रीकांत व कु.पूजा बुधवंतयांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सोनाली अभंग यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.