शबनम न्युज | पुणे
भगवान महावीरांची शिकवण ही सहिष्णूतेकडे नेणारी आहे, त्यांचे विचार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोडदौड सुरू आहे, असे प्रतिपादन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वाघोली येथील त्यांच्या प्रचार दौऱ्यात केली. जैन स्थानक संघ वाघोली यांच्या वतीने आयोजित रॅली सहभागी होत उपस्थितांना संबोधित करत ते बोलत होते.
वाघोलीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी प्रचार दौऱ्याचा प्रारंभ केला. याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उमेश उंद्रे, उपाध्यक्ष गणेश सातव, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव, हवेलीचे सरचिटणीस विजय राचक, वाघोली महिला मोर्चा अध्यक्षा विद्या पाटील, युवा सेना जिल्हा संघटक गणेश मस्के, माजी उपसरपंच शांताराम बापू कटके, महेंद्र भाडळे, माजी पंचायत समिती सदस्य श्याम गावडे, जैन शाळा व संघाचे अध्यक्ष दीपक कर्नाड, सचिव मनोज कांकरिया, उपाध्यक्ष निलेश शेट्टी, माजी अध्यक्ष चंद्रशेखर लोखंड उपस्थित होते.
यावेळी आढळराव बोलताना म्हणाले की, जलजीवन विचाराची गरज ध्यानात घेऊन पुढील मार्गक्रमण आपल्याला करावे लागेल, पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठीशी राहा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.