शबनम न्युज | आळंदी
आळंदी येथे हनुमान जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आलं होता. यावेळी महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव म्हणाले कि, विकासाचे मुद्दे पुढे येणे महत्त्वाचे असताना टीका करण्यावर भर दिला जातोय. समोरच्यांनी कितीही टीका करू द्या मी काम करण्यावर भर देतोय. पाच वर्षांपूर्वी आपण ज्याला निवडून दिले अडचणीच्या वेळेस धावून येणे, दोन गोड शब्द बोलणे एवढीच अपेक्षा लोकांची होती. मला तुम्ही वीस वर्ष ओळखता या कालावधीत मतदारसंघ पिंचून काढला. लोकांना निधी पोहोचला मध्यंतरी माझा पराभव झाला. परंतु मी हार मानली नाही. उलट ज्या लोकांनी मला मत दिले त्यांच्यासाठी लढत राहिलो. योजना प्रकल्प राबवण्याचा माझा मानस आहे, ते अमलात आणण्यासाठी तुमच्या पाठिंबाची आवश्यकता आहे.
यावेळी बोलताना दिलिप अण्णा मोहिते पाटील म्हणाले कि, आळंदीकरांनी अधिक पदाधिक्य दादांना दिले आहे. दादांना खासदार करण्यामागे आळंदीकर यांचा मोठा हात आहे. आळंदीकर फार जागृत आहे. या भागातून रेल्वे जाणार आहे. त्यामुळे आळंदीचे महत्त्व वाढणार आहे. चाकण आळंदी जोडली गेली तर एक मोठी महानगरपालिका तयार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. चाकणला स्वतंत्र पावर हाऊस उभारण्याचा आमचा मानस आहे. पाण्याचा प्रश्न पूर्णतः संपवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही काम करणारे लोक आहोत त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे आपण गेले पाहिजे.
यावेळी राजेंद्र बाबू वागस्कर म्हणाले, ग्रामीण भागात काम करत असताना सुद्धा शहरी भागात दादांनी लक्ष दिले. आढळराव दादा पाटील यांना भोसरी विधानसभेतून भरघोस मत मिळणार आहे.
डाँ. विकास थोरवे म्हणाले, अरे कुठे लपून बसले हो साडेचार वर्ष? तुम्हाला शेतकऱ्यांची प्रश्न दिसले नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचता आले नाही. पदावर नसतानाही शिवाजीराव आढळराव दादा यांनीही हे काम केलं दादा विजय निश्चित तुमचाच होईल .
याप्रसंगी पदाधिकारी यांनी वाजत गाजत शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्वागत केले.जोरदार प्रतिसाद या मेळाव्याला मिळाला. मरकळ आळंदी या भेटीने दौऱ्याची सांगता करण्यात आली.
प्रसंगी, आमदार दिलिप अण्णा मोहिते पाटील, मनसे नेते राजेंद्र बाबू वागस्कर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी प्रकाशशेठ क-ुहाडे, शहराध्यक्ष भाजपा किरणशेठ येळवंडे, शहराध्यक्ष शिवसेना राहुल चव्हाण, मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर, आरपीआय शहराध्यक्ष योगेश रंघवे, युवक अध्यक्ष सौरभ गव्हाणे, अध्यक्ष युवा मोर्चा भाजप वासुदेव तुर्की, संघटन सरचिटणीस ज्ञानेश्वर बनसोडे, युवा मोर्चा सरचिटणीस खेड अँड आकाश जोशी, पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघ अध्यक्ष बाबासाहेब ठाकूर, नगरसेवक रामभाऊ भोसले, भाजपा कार्याध्यक्ष अँड बंडू नाना काळे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विमलताई ठाकूर, महिलाध्यक्ष भाजपा संगिता फपाळ, सभापती भगवान शेठ पोखरकर, सभापती कैलासराव निमोने, उपसभापती कैलास सांभारे, राष्ट्रवादी खेड तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर, राष्ट्रवादी खेड तालुका उपाध्यक्ष शुभमभाऊ बालघरे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पप्पू दादा टोपे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर, पीएमआरडीए संचालक वसंत भसे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद निर्मलाताई पानसरे, महाराष्ट्र प्रदुषण नियमक मंडळ सदस्य नितिन गोरे, भाजपा भटकया विमुक्त आघाडी खेड, भाजपा नेते प्रियाताई पवार, जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे, राष्ट्रवादी नेते प्रकाश वाडेकर, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.