शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे, येथे ‘जागतिक मराठी राजभाषा गौरवदिन’, २७ फेब्रुवारी, कविश्रेष्ठ, विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त `मराठी विभाग व विद्यार्थी विकास मंडळ´ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. प्रथम ‘मराठी साहित्य अविष्कार मंडळ भित्तिपत्रक उद्घाटन’ करून, महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पाहुण्यांचे स्वागत गीताने झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून, कला व वाणिज्य महाविद्यालय, चाकण, मराठी विभाग, प्रा. डॉ. शिवाजीराव एंडाईत हे लाभलेले होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक, प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ, मराठी, विभाग प्रमुख, यांनी केले. महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम राबविण्यामागील हेतू व उद्दिष्टे सांगितली. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या शुभहस्ते, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची विश्व प्रार्थना `पसायदान व त्याचा अर्थ` फ्लेक्स बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय प्रा. कैलास अस्तरकर- अर्थशास्त्र विभाग प्रमुख, यांनी करून दिला.
त्यानंतर ` मराठी भाषेपुढील आव्हाने´, या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना. प्रा. डॉ. शिवाजीराव एंडाईत, यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून संतांची मराठी, साहित्यिकांनी गौरविलेली मराठी, कुसुमाग्रज यांचे साहित्यातील योगदान, मराठी भाषेचे महत्त्व,, मराठी भाषा कशी श्रेष्ठ आहे. तिच्या वाढीसाठी, तिच्या वृद्धीसाठी आपण काय केले पाहिजे. भाषेच्च्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे संवर्धन आपण कसे करावे, त्यासाठी आपण काय केले पाहिजे. काळाची पाऊले आपण कशी ओळखली पाहिजेत. मोबाईलसह इतर प्रसारमाध्यमांचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे. विद्यार्थ्यांना आपले स्वत्व, स्वाभिमान व कर्तव्य याचे आत्मभान करून दिले.
त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे, प्राचार्य, डॉ. हंसराज थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना सांगितले की, कुसुमाग्रजाचे लेखन, त्यामध्ये कविता, कथा, कादंबरी व नाटक त्यामधील मूल्ये, तत्वे , सामाजिक भान, त्यांचे साहित्यक्षेत्रावर असलेले उपकार या भावनेतून कृतज्ञता व्यक्त करताना आपणा सर्वांना आनंद होत आहे. म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण जागतिक`मराठी राजभाषा गौरव दिन´ म्हणून साजरा करीत आहोत. त्यांच्या साहित्याने समाज मनाला वेड लावलेले आहे, आकर्षित केलेले आहे. त्यांचे आपणा सर्वावर अगणित उपकार आहेत.
त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये व्यावसायिक स्टॉल देखील लावलेले होते. त्यातूनही त्यांना चांगला नफा प्राप्त झाला. त्यातून त्यांच्या पदार्थांच्या गुणवत्तेनुसार, नफ्यानुसार तीन क्रमांक काढण्यात आले. वरील सर्व उपक्रमासाठी संस्थेचे, खजिनदार, मा. श्री. मयूर ढमाले यांचे अनोमल मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्रा संजीव कांबळे, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग, प्रा. शाहूराज येवते- विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख, डॉ. छाया जोशी, इंग्रजी विभाग प्रमुख, कैलास अस्तरकर- कला विभाग प्रमुख, प्रा. सविता मानके- भूगोल विभाग, प्रा. सीमा साळुंखे- कनिष्ठ विभाग प्रमुख, प्रा. मीरा केसकर इत्यादी सर्वजण उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले, या कार्यक्रमाचे आभार, प्रा. संजीव कांबळे यांनी मानले. डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी पसायदान गायले व या कार्यक्रमाचा समारोप झाला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्ध विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.