शबनम न्युज | निगडी
पुणे-मुंबई महामार्गावर टिळक चौक येथे भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद कोलते यांनी केली.
ते म्हणाले, निगडी येथील स्वानंद दूध डेअरी ते सावली हॉटेल पर्यंत नवीन भुयारी मार्ग करण्यात यावा, टिळक चौकामध्ये मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत आहे. या ट्रॅफिकच्यामुळे निगडी-यमुनानगर व प्राधीकरण परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. काही दिवसा पुर्वी टिळक चौक निगडी ते दुर्गा नगर चौक – बजाज अट्रो लिमिटेड ( मट्रेरिअल गेट) या संपर्ण रस्त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत अर्बन स्टीटचे संपूण काम दोन्ही बाजूणे झालेले आसून रस्ता दिसायाल सुंदर झाला पण तो अंरूद झाला.
या ट्राफिक मधून मुक्तता करण्यासाठी स्वानंद दूध डेअरी ते सावली हॉटेल पर्यंत नवीन भुयारी मार्ग करण्यात यावा. टिळक चौकामध्ये मोठ्या प्रमाणात चाकण, तळेगाव, भोसरी राजंगाव एमआयडीसीतून कामगारांना नेआन करण्यासाटी बस येत जात. असतात. त्याच बरोबर औद्योगिक भागातून अवजड वाहनांची वाहतूक या चौकातून होत असते.
“तरी महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष घालून नवीन भुयारी मार्ग तयार करण्यात यावा. हा भुयारी मार्ग करण्यासाठी भौगोलिक परिस्थिती ही अनुकूल असून. प्रशासनाने आपली अनुकूलता दाखवली तर स्थानिक नागरिकांचे व इतर कर्मचारी वर्गाचे ट्राफिक जाम मधून नक्कीच मुक्तता होईल.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.