शबनम न्यूज , प्रतिनिधी :
मुलांच्या मागे जसे वडिलांचे नाव लावले जाते तसेच आईचे नावही लावले जाणे आवश्यक आहे त्यासाठी फक्त घोषणा नाही तर सरकारने कायदा करावा अशी मागणी मानिनी फाउंडेशन च्या अध्यक्ष डॉक्टर भारती चव्हाण यांनी केली होती.. त्यांच्या या मागणीला यश आले असून महाराष्ट्र सरकारच्या वतीने आता याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली, तसेच महिलांच्या नावावर घर घेतले तर एक टक्का टॅक्समध्ये सवलत मिळेल असे अजित पवार यांनी सांगितले आहे. चौथे महिला धोरण सरकारने आणले असून या धोरणानुसार मुलांच्या नावापुढे आईचे नाव मग वडिलांचे नाव लावलं जाईल अशा प्रकारचे हे धोरण असून हे धोरण महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मंजूर केले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी दिली.
या मागणीसाठी मानवी फाउंडेशनने या बाबत जनजागृती साठी देशव्यापी मोहीम हाती घेतली होती ,त्यासाठी देशभर जनजागृती करण्यात आली, महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांनी या उपक्रमास पाठिंबा दिला , मानिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष भारती चव्हाण यांच्या या मागणीला यश आले असून महाराष्ट्र सरकार च्या वतीने मुलांच्या मागे जसे वडिलांचे नाव लावले जाते तसेच आईचे नाव लावणे आवश्यक असणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केली.