शबनम न्युज | वाशी
आरक्षण मिळेपर्यंत नोकरी भरती करायची नाही, केलीच तर आमच्या जागा राखून ठेवायच्या. 57 लाख कुणबी नोंदी मिळाल्या, यापैकी 37 लाख जणांना प्रमाणपत्र दिली. त्याचा तपशील द्यावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश त्वरित काढण्यात यावा, आज रात्री अध्यादेश देश काढला नाही, तर उद्या 12 वाजता आझाद मैदानावरच जाण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे.
तसेच आज रात्री नवी मुंबईतच मुक्काम केला जाणार आहे. अध्यादेश मिळाला तर गुलाल उधळायला आझाद मैदानात नाही तर आंदोलनासाठी जाणारच, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या लेखी आश्वासनांवर चर्चा करण्यात आली. राज्यात 57 लाख नोंदी सापडल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी 37 लाख नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. ज्या नोंदी सापडल्या, त्यांची यादी ग्रामपंचायत मध्ये लावण्याची मागणी ही त्यांनी केली. त्यांना प्रमाणपत्र दिले त्यांचा तपशील देण्यात यावा, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले आहे. पण त्याचा अध्यादेश काढला नाही. सरकारने तो अध्यादेश आज सायंकाळपर्यंत काढावा, नाहीतर उद्या आम्ही आझाद मैदानावर येणार आणि तिथे येण्यासाठी आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.