शबनम न्यूज , प्रतिनिधी :
आळंदी : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव आळंदी या ठिकाणी राज्यशास्त्र विभाग विद्यार्थी कल्याण मंडळ आणि भोसरी विधानसभा मतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय तरुण जागा हो, लोकशाहीचा धागा हो, भारतीय राज्यघटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय लोकशाही मतदारांचे अधिकार व कर्तव्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेऊन विजेत्या स्पर्धकांना भोसरी विधानसभा मतदारसंघ यांच्यामार्फत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या बूथ लेवल अधिकाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले व मतदारांना मतदान करण्यासंदर्भात सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक माणिक कसाब यांनी भारतीय संविधानामध्ये मतदानाचा अधिकार भारतीय नागरिकांसाठी कसा महत्त्वपूर्ण असून त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकावर आहे असे मत व्यक्त करून कार्यक्रमाचा उद्देश व भूमिका सविस्तर स्पष्ट केली.
यावेळी अपर्णा देशपांडे नायब तहसीलदार भोसरी विधानसभा मतदारसंघ नोंदणी अधिकारी भोसरी यांनी ज्या मतदारांची मतदार नोंदणी झालेली आहे अशा मतदारांनी लोकसभा, विधानसभा व पंचायत राजच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले.
राजेश अंकुश आगळे सहाय्यक आयुक्त मतदान नोंदणी अधिकारी भोसरी विधानसभा मतदारसंघ यांनी भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा मूल्यवान अधिकार दिलेला असून तो अधिकार आपण वेळोवेळी वाजवणे अत्यंत आवश्यक असून आपण आपले मतदानाचे कर्तव्य न बजावल्यामुळे राजकारणात योग्य व्यक्ती निवडून येत नसून त्यामुळे सुदृढ लोकशाही टिकून राहत नाही यासाठी मतदान करण्याचे कर्तव्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग पवार तहसीलदार सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी भोसरी विधानसभा मतदारसंघ भोसरी यांनी भारतीय लोकशाहीच्या प्रक्रियेमुळे सक्षम नागरिक आपल्या मधून कसे घडतात या संदर्भात मत व्यक्त करून आपण राज्यघटनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले अधिकार आणि कर्तव्य पालन करण्याची आवश्यकता व्यक्त केली तसेच जे विद्यार्थी मतदार होण्यासाठी पात्र आहेत त्यांनी मतदार यादी मध्ये त्वरित नाव नोंदणी करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हंसराज थोरात यांनी 25 जानेवारी निवडणूक आयोग स्थापनेचा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो असे मत व्यक्त करून लोकशाहीतील मताचा अधिकार हा सर्वसामान्यना मिळालेला अत्यंत मूल्यवान अधिकार असून या अधिकारामुळे योग्य सत्ताधारी कशी सत्ता चालवितात तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारी सत्ता कशी नष्ट होते या संदर्भात मत व्यक्त करून मतदानाच्या प्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले .
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले .
या कार्यक्रमासाठी डॉक्टर पांडुरंग मिसाळ, प्राध्यापक संजीव कांबळे ,प्राध्यापिका शैलजा वाळुंज ,डॉक्टर छाया जोशी ,प्राध्यापक शाहूराज येवते ,प्राध्यापक कैलास अस्तरकर ,प्राध्यापक परमेश्वर भत्तासे, प्राध्यापक विकास दिघे ,प्राध्यापक दिलीप बारी, प्राध्यापक रोहित कांबळे , प्राध्यापिका दिपाली ताम्हाणे , डॉक्टर समीना मोमीन , प्राध्यापिका दिपाली सोनवणे, डॉक्टर प्रीती बोऱ्हाडे , प्राध्यापिका प्रेरणा पाटील, प्राध्यापिका सोनाली अभंग, प्राध्यापिका माधुरी चौधरी, प्राध्यापिका पूजा खवले, श्री प्रवीण भावे, सौ वर्षा ताजने, श्री वैभव बडवे व श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सविता मानके यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका यशोदा आनेराव यांनी मानले या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.