शबनम न्यूज प्रतिनिधी,
महाराष्ट्रात पत्रकारांवरील होणारे हल्ले थांबविण्यासाठी, तसेच पत्रकारांच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी व महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असल्याने पत्रकारांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तसेच राज्य सरकार यांच्यामार्फत सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी पत्रकारांसाठी वेगळं महामंडळ स्थापन करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अजिज भाई शेख यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात पत्रकारांना न्याय मिळण्यासाठी आपण लवकरात लवकर पत्रकार महामंडळ स्थापन करावे तसेच अनेक पत्रकारांना राहण्यासाठी घर नाही त्याचबरोबर पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळत नाही अशा अनेक समस्या आहेत पत्रकारांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाही पत्रकारांना चांगले पगार देखील नाही कोरोना काळामध्ये अनेक पत्रकार हे मृत्युमुखी पडले पण त्यांना कुठलीही मदत शासनाच्या वतीने झाली नाही याच हेतूने पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी आपण करत असल्याचे अजिज भाई शेख यांनी निवेदनात नमूद केले आहे.