शबनम न्युज | मुंबई
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान झाले. आता मतदान संपलं आहे. राज्यातील एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. निवडणूक मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणीसाठी विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी घ्यावी लागते असा नियम आहे. यासंदर्भातील परवानगी अद्याप आलेली नाही. त्यामुळे जोवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी येत नाही तोवर मतमोजणीला सुरुवात होऊ शकत नाही.
Advertisement