शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय व रामचंद्र पाटील औटी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे. येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर ( शिक्षक दिन) म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून झाली.. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये, डॉ. पांडुरंग मिसाळ ( सांस्कृतिक विभाग प्रमुख ) यांनी गुरुचे महत्त्व सांगत असताना गुरूंची लक्षणे व कर्तव्ये सांगितली. हा कार्यक्रम साजरा करण्यापाठीमागील भूमिका, हेतू व उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना शिक्षका बद्दलचा आदर व आपुलकीची भावना व्यक्त केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन व कार्य यावर प्रकाश टाकत असताना, शिक्षक दिन का साजरा केला जातो? या मागील कारण, त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान किती मोलाचे आणि महत्त्वाचे आहे हे अनेक उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिले. त्याच बरोबर अब्राहम लिंकनचे ‘हेडमास्तरांस पत्राचे भावार्थासह विवेचन केले. त्यांचे विचार शिक्षकांसाठी अतिशय प्रेरणादायी व मूल्यवान आहेत. त्याचे पुन्हा पुन्हा वाचन करण्यात आले पाहिजे. यशस्वी शिक्षक होण्यासाठी ती यशाची गुरुकिल्ली आहे. याप्रसंगी त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आपल्या गुरुजनांचे अनुभवही सांगितले. यशस्वी विद्यार्थी घडविण्यासाठी गुरुजनांचे योगदान किती महत्त्वाचे आहे हेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.काही विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये शिकविण्याचे काम केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व आज शिक्षक झालेले विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे संयोजन, प्रा.सीमा साळुंके यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी प्रा.शाहूराज येवते, बी. बी.ए. (सी. ए., विभाग प्रमुख), प्रा. संजीव कांबळे (परीक्षा विभाग प्रमुख), प्रा. माणिक कसाब (राज्यशास्त्र विभाग प्रमुख), प्रा. विकास दिघे (जिमखाना विभाग प्रमुख), प्रा. शैला वाळुंज (ग्रंथालय विभाग प्रमुख),प्रा.प्रेरणा पाटील,प्रा.सोनाली अभंग,प्रा,यशोदा खुळखुळे,प्रा.दीपाली सोनवणे,प्रा.सविता मानके ,प्रा.सोनाली तापकीर, प्रा.आरती शेगावकर प्रा.विश्वनाथ व्यवहारे,प्रा.मीरा केसकर,प्रा.रेखा सुतार,प्रा.सचिनकुमार सोनार,प्रा.मयुरी वर्पे प्रा.प्रीती चोरडे,प्रा.हिमानी पडळसेकर,कार्यालयीन अधीक्षक- श्री.प्रवीण भावे,सौ.वर्षा ताजणे,श्री.सुशेन राठोड,श्री.वैभव बडवे.श्री.विनोद मोगल,श्री.श्रीकांत कांबळे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रा.डॉ. सुरेंद्र पवार यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार, प्रा. परमेश्वर भताशे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. सामुदायिक पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला. अशी माहिती प्रा. प्रविण डोळस, (प्रसिद्धी विभाग प्रमुख) यांनी दिली.