शबनम न्युज | पुणे
मी तिथी प्रमाणे दोन्ही शिवजयंती कार्यक्रमाला शिवनेरीवर उपस्थित असतो. मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याला माथा टेकून मी माझ्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे.अशा भावना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केल्या. शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे.
किल्ले शिवनेरी येथे माथा टेकून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, शिवनेरीचे दर्शन घेऊन आल्यावर मी एक संकलप केला आहे की, या पुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळात सुद्धा शिवरायांच्या साक्षीने स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की, यवा पुढचं आयुष्य माझं निवडणुकीच असो वा निवडणुकीच्या बाहेरच असो शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी, कांद्याचा भाव, दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.मी हे प्रामाणिकपणे सांगतो आहे नौटंकी करत नाही, मी शेतातला माणूस आहे, या शेतीतातला माणूस आहे, त्यामुळे या शेतकर्यांचा वेदना जास्त जवळून कळत असल्याचं आढळराव पाटील म्हणालेत. शेतकऱ्याच्या प्रश्नाला भाव मिळावा अशी अपेक्षा माझी आहे.
अमोल कोल्हे यांच्या भेटीवर बोलताना ते म्हणाले, मी कुठलीही रणनीती घेऊन इथे आलेलो नाही. मी दिड वर्ष जनतेच्या सहवासात राहून, जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहेत. मी कुठल्याही प्रकारची नौटंकी ना करता त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे. त्यामुळे मला सामन्यांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने समजतात. त्यांना सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि ते मी सोडवणारच अशी ग्वाही देखील आढळराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.