शबनम न्यूज | आळंदी (दि.०७ डिसेंबर) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मा.राजीव पाटील प्रशासकीय संचालक – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ प्राचार्य डॉ. हंसराज थोरात शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय,डॉ. प्रमोद इंगळे प्राचार्य- ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी देशाची वैचारिक घडी व्यवस्थित बसवण्यात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे. जातिव्यवस्था हा भारतीय समाजाला जडलेला जुनाट आजार. हा आजार मुळापासून उखडून टाकल्याशिवाय भारतीय समाजाची व भारताची प्रगती होणार नाही, ही त्यांची धारणा होती.महाविद्वान, महानायक, महान इतिहासकार, भारतीय संविधान निर्मिता, युगपुरुष, बोधीसत्व, महामानव अशी अनेक बिरुदे लाभलेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्य यावर भाष्य केले. या कार्यक्रमाला मा. मयूर ढमाले खजिनदार – गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला डॉ. पांडुरंग मिसाळ, प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब, डॉ. रणजीत कदम, प्रा. कैलास अस्तरकर प्रा. परमेश्वर भत्ताशे, मा. प्रवीण भावे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. माणिक कसाब यांनी केले आणि सूत्रसंचालन प्रा. संजीव कांबळे यांनी केले तर आभार प्रा. कैलास अस्तरकर यांनी मानले. अशी माहिती महाविद्यालयाचे, प्रमुख,प्रसिद्धी विभाग,प्रा.प्रविण डोळस दिली.