शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
केंद्रातील भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. तरीही भाजपा जनआशीर्वाद यात्रा काढत आहे. या जनआशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आजपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या अपयशी, लोकांना कोविड महामारीत ढकलणाऱ्या, सूडबुद्धीच्या लोकशाहीविरोधी कार्यपद्धतीवर निशाणा साधतील, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आजपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या लोकहिताच्या विपरित राजकारणावर निशाणा साधतील, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.@maheshtapase pic.twitter.com/aPUHGgHGHr
— NCP (@NCPspeaks) August 21, 2021
वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ, कोरोना काळात आलेले अपयश, पेगासस अशा विविध गोष्टींचा उहापोह या पत्रकार परिषदेत केला जाईल. शिवाय ओबीसी व मराठा आरक्षणात केंद्र सरकार कशी चालढकल करून राज्यात तेढ निर्माण करत आहे, हेदेखील जनतेसमोर मांडण्यात येईल, असे तपासे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, आजी-माजी आमदारदेखील उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे…