मुंबई | शबनम न्यूज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आजी-माजी आणि भावी सहकाऱ्यांबद्दल केललं एक विधान आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानानंतर आता भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपाकडून देखील प्रतिक्रिया आली आहेकेलेल्या एका विधावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं असून, नेते मंडळींकडून विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. शिवाय, भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार का? यावर देखील सर्वसमान्यांपासून ते राजकाराण्यांपर्यंत चर्चा सुरू आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. आम्ही सर्व महाविकास आघाडीचं काम एकत्र करत असताना आजपर्यंत तरी व्यवस्थित चाललेलं आहे. तरी त्या वक्तव्याला मी फार काही महत्व देत नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी काय बोलव, काय बोलू नये त्यांचा प्रश्न आहे.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.