शबनम न्यूज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
अशोक विजयादशमीच्या ऐतिहासिक दिनी १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ लाख अनुयायींसोबत दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. देशात बौद्ध धम्माचे चक्र बाबासाहेबांनी गतिमान करीत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केल्याने हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून ओळखला जातो. आता डॉ.बाबासाहेबांचे स्वप्नपूर्वीसाठी सर्वांनी एकत्रित येण्याचा संकल्प करावा, असे आवाहन बहुज1न समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी केले. भुसावळ येथे संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
सम्राट अशोक तसेच डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्याच्या अनुषंगाने मान्यवर कांशीराम यांनी जीवन समर्पित केले.”मेरे सपनों का भारत, सम्राट अशोक के भारत जैसा होगा..”असे मान्यवर कांशीराम नेहमी म्हणायचे. सम्राट अशोकांचा भारत म्हणजेच ‘बौद्धमय भारत’. भारतात बौद्ध धम्माची बीजे सम्राट अशोकांनी रोवली. आजही सम्राट अशोकाकडून मिळालेला वारसा दिशादर्शक, देशाला ओळख देणारी आहे.मा.कांशीराम यांनी याच विचारधारेला राजसत्तेत परिवर्तित करण्याचे महत्वाचे काम केले.
मा.कांशीराम यांना अभिप्रेत असलेला ‘सम्राट अशोक’ यांचा भारत निर्मित करण्याच्या कार्यपथावर मा.बहन मायावती जी अग्रेसर आहेत. मा.बहनजींनी त्यांच्या काळात सर्वसमावेश विकासासाठी सर्वजन ‘हितकारत’ निर्णय घेत, अठरा विश्व दारिद्रयात खितपत पडलेल्या समाजाचा उद्धार केला. दलित, शोषित, पीडितांना शासनकर्ती जमात बनवण्याचे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न मा.कांशीराम यांनी पूर्णत्वास आणले. मा.बहन मायावती जी या स्वप्नाची अंमलबजावणी करीत समाजाला न्याय दिला.
महाराष्ट्रात देखील सर्वसमावेश विकासासाठी मा.बहनजींच्या नेतृत्वात बसपा सत्तेवर येणे आवश्यक आहे. सर्वांनी एकत्रित येवून बसपाच्या निळ्या झेंड्यावर विश्वास दर्शवला तर ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असे अँड.ताजने म्हणाले. कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार गावखेड्यासह तरूणांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन करीत त्यांनी आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले.
कार्यक्रमात प्रदेश महासचिव रविंद्र गवई, जिल्हा प्रभारी सुरेश गणवीर, युवराज बारेला, जिल्हाअध्यक्ष अॅड.नितीन रजाने, उपाध्यक्ष प्रकाश मेघे, महासचिव राजाराम मोरे, कोष्याध्यक्ष नारायण अडकमोल, सचिव मायाताई गायकवाड, संघटक ईश्वर जाधव,बी व्ही एफ अनिल गाढे, विलास कुमार लुल्हे तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मा.कांशीराम यांनी मानवतेला ‘सम्यक मार्गा’वर आरूढ केले-रैना
अथक मेहनत, संघर्षाच्या जोरावर मानवतेला संतुष्ट करण्यासाठी संपूर्ण मानवतेला ‘सम्यक मार्गा’वर आरूढ करण्यासाठी मा.कांशीराम यांनी त्यांचे जीवन अर्पित केले.बहुजनांनी मा.कांशीराम साहेबांसोबत मिळून गावोगावी, शहरोशहरी, गल्ली-बोळात बहुजन आंदोलनाची ज्योत तेवत ठेवली. देशात दलित-शोषित समाजाचा सन्मान-स्वाभिमान तसेच आत्मनिर्भरतेने जीवन व्यतीत करण्यासाठी आपले घरदार सोडून मा.कांशीराम साहेबांनी ऐतिहासिक सामाजिक आंदोलनाची जमीन तयार केली, अशी भावना प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी व्यक्त केली. कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक क्रांती घडवून आणत दीनदुबळ्यांना स्वतःचे वाली बनवले, असे रैना म्हणाले.