विरोधी पक्षाकडे लक्ष्य न देणंच योग्य, ते लोकांची इमेज खराब करत असतात
शबनम न्यूज : मुंबई (दि.२३ जानेवारी) :- नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवानद केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाकडे लक्ष्य न देणंच योग्य आहे. ते सतत काही ना काही आरोप-प्रत्यारोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात.आपल्या कामावर आपण फोकस केलेला बरा. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनर्दन मुख्यमंत्र्यासोबत आणि आमच्या सोबत ठाम उभी आहे आणि त्यांच विश्वास आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदम ठीक आहेत. संध्याकाळी ते दिसतील. सर्वांनी काळजी घ्या. कोरोनाची केसेस वाढत आहेत,आणि मुख्यमंत्री लवकरच अॅक्शनमोडमध्ये दिसतील.असं त्यांनी सांगितलं.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री @AUThackeray यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/VFXRD18ZY5
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 23, 2022