शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आज पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आले असताना त्यांना गावगुंड मोदीबद्दल केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, भाजपनेच पंतप्रधान पदाची गरिमा संपविण्याचे काम केले आहे. अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे त्यांनी केली. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस वतीने शनिवार ४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भव्य दुचाकी परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे की, मी गावगुंड बद्दल बोललो होतो आणि तो गावगुंड पुढे आला. भाजपाने पंतप्रधान पदाची गरिमा संपविण्याचे काम केले आहे. गुंडागर्दी रस्त्यावर केली गेली माझ्या प्रतिमेस जी जाळपोळ केली, जी काय विटंबना करायची ती केली हे जी परंपरा आहे ती भाजपाची आजची नाही.