शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतिने शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात डॉ बाबा साहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निदर्शने केली.
”बीजेपी हमसे डरती है, ईडी को आगे करती है”, ”मोदी जब जब डरते है, तब तब ईडी को आगे करते है”, ”शर्म करो, शर्म करो, मोदी सरकार शर्म करो”, ”भाजप वाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, ”नवाबभाई आगे बडो, हम तुम्हारे साथ है”, ”गांधी लडे थे गोरे से, हम लढेंगे चोरे से”, ”भाजप सरकार हाय, हाय, भाजप सरकार हाय हाय” अशा जोरदार घोषणा दिल्या गेल्या
यावेळी शहराध्यक्ष म्हणाले अजित गव्हाणे म्हणाले की कोणतीही नोटीस न देता मंत्री नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीसाठी घरी बोलविले. मंत्री मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केंद्र सरकार, भाजपच्या विरोधात भूमिका मांडत होते. एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्या चुकीच्या कारवाईची पोलखोल केली. त्याचा सुड घेण्यासाठीच मंत्री मलिक यांच्यावर कारवाई केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार देशात काम चालले आहे का असा प्रश्न पडतो. ईडी, सीबीआय, इनक्म टॅक्स या वेगवेगळ्या एजन्सींचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. देशातील सरकार सुडाची भावना ठेऊन काम करत आहे.
महागाई,बेरोजगारी प्रंचड वाढली. त्यावरील लक्ष दुर्लक्ष करण्यासाठी अशा कारवाया केल्या जात आहेत.दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाच्या भ्रष्टाचार वाढलेला आहे त्यांचा भ्रष्टाचार आमच्या नेत्यांनी लोकांसमोर उघडकीस आणयाला लागले की त्यांना ईडी व CBI मार्फत खोट्या कारवाई करून बदनाम करण्याचा कट भाजपा सरकारचा रचत आहे नवाब मलिक यांनी भाजपा सरकारमधील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत त्यामुळे इडी दाऊद इब्राहिम व नवाब मलिक यांचे संबंध जोडून त्यांची बदनामी करण्याचा कट भाजपा सरकार करत आहे लोकांना जाती पाती मध्ये विभागण्याचे काम भाजप करत असून त्याद्वारे जनतेसमोर चुकीचे दृश्य उभारले जातआहे
युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले की, भाजपा सरकार मधील काही ठराविक नेते महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे पत्रकार परिषदेत घेतात आणि त्या नेत्यांवर लगेच ED ची कारवाई होते याचा अर्थ ईडी व सीबी आय अधिकारी,देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याची शंका उपस्थित होत आहे यांना बघून असे वाटते की हे सगळे जुनू एकाच वर्गात शिकत होते की काय अशी शंका वाटते. तसेच ED व सीबीआयचे अधिकारी शासकीय पदाचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर उमेदवारी लढवितात यावरून सिद्ध होते की भाजपा ईडी व सी बी आय यासारख्या सरकारी यंत्रणा हाताशी धरून भाजप व केंद्र सरकार महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे.
महीला अध्यक्षा सौ कविता ताई आल्हाट म्हणाले की, भाजपा केंद्र सरकारव्दारे ईडी व सीबीआय यांना हाताशी धरून महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न तसेच सर्वात खालच्या पातळीला जाऊन राजकारण करत आहे.
योगेश बहल म्हणाले, ”देशाच्या 74 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राजवटीत एजन्सींचा सर्वाधिक वापर होत आहे. भाजपचा बुरखा फाडणा-यांवर कारवाईसाठी एजन्सींचा वापर केला जातो. त्यामुळे सर्वांनी जागरुक होण्याची गरज आहे. हिटलरपेक्षा मोदी सरकार खराब आहे. त्यामुळे भाजपला त्यांची जागा दाखविली पाहिजे. सत्तेसाठी भाजपवाले येडे झाले असून त्यासाठी ईडीचा वापर करतात”
भाऊसाहेब भोईर म्हणाले, ”यापूर्वी लोकांना ईडी हा प्रकारच माहित नव्हता. परंतु, खालच्या पातळीवर जाऊन विकृतपणे काम केले जात आहे. नवाब मलिक हे केंद्रीय एजन्सीचे चुकीचे काम पुढे आणत होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली. ईडीकडे लक्ष वेधून मुळ प्रश्नांकडील लक्ष हटविले जात आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे”.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयूर कलाटे, राजू बनसोडे, संजय वाबळे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक काळुराम पवार, जगनाथ साबळे, उपाध्यक्ष अकबर मुल्ला, तानाजी खाडे, गोरक्ष लोखंडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, विजय लोखंडे, कविता खराडे, उज्वला ढोरे, पल्लवी पांढरे आदी कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.