शबनम न्यूज : पुणे (दि.२८ मार्च) :- “मनापासून निरपेक्षपणे केलेले कुठलेही कार्य समाजहिताचेच ठरते. सामुदायिक इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणताही विधायक उपक्रम यशस्वी ठरतो.” असे प्रतिपादन ज्येष्ठ आंतराष्ट्रीय विचारवंत आणि समर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
समर्पण संस्थेतर्फे नुकताच, नवज्योत परिवार संस्थेस ‘राष्ट्रीय सेवा समर्पण पुरस्कार-2022’ डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला, सदर सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.घाणेकर बोलत होते. नवज्योत परिवाराचे अध्यक्ष संजय लगाडे,सचिव सौ.शीतल संजय लगाडे,उपाध्यक्ष सोमेश्वर विटकर, आणि सभासद यशवंत गरड, सुनिल म्हसकर,राहुल वाघमारे, शंकर पारडे या पदाधिका-यांना सदर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले असल्याचे समर्पण संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ.योगेश जोशी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन समर्पण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रवीण शेटे आणि सचिव सौ.प्रतिमा अरुण काळे यांनी केले. नवज्योत परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय लगडे यांनी संस्थेने दिव्यांग..वंचित घटकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल विस्तृत माहिती दिली. रोहित लगाडे यांनी आभार मानले. उत्तरार्धात यशवंत गरड आणि स्वप्नील लगाडे यांनी वाद्यसंगीताचा विशेष कार्यक्रम सादर केला.