शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
आकुर्डी मुख्य बाजार पेठ मधील रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी निखिल दळवी (संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान) यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, आकुर्डी मुख्य बाजार पेठ मधील रसत्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम बरेच दिवसांन पासुन सुरु आहे आत्ता ज्या ठिकाणी काम चालु आहे त्या ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होता आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाड़ी कडून आकुर्डि मेन रोड कड़े येणार रस्ता सदर सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याच्या कामा मुळे एक महिन्या पासुन बंद ठेवण्यात आला आहे त्या मुळे नागरिकांना मोठा वळसा घालून विठ्ठलवाड़ी कडून आकुर्डी बाजार पेठ मेन रोड कड़े जावे लागत आहे ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकांचा एका बाजुचा रस्ता काम चालू असल्या मुळे बंद ठेवण्यात आला आहे एका बाजूने वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे पण रस्ता लहान असल्या मुळे वाहतूक कोंडी होत आहे वाहनांनच्या मोठ मोठ्या रांगा लागत आहेत छोटे अपघात देखील होत आहेत येत्या २१ जूनला आकुर्डि येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आहे आकुर्डि मधे एक दिवसा करता मुकामा साठी येणार आहे लाखो वारकरी व भाविक भक्त संत तुकाराम महाराज पालखीच्या दर्शनासाठी आकुर्डी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येत असतात २१ जून ला पालखी येन्या त्या आधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर विट्ठलवाड़ी कडून आकुर्डि मुख्य बाजार पेठ मेन रोड कड़े जाणारा रस्ता लवकरात लवकर वाहातुकी साठी चालू करवा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
आकुर्डी मधील दुकानदार व्यापारी वर्ग रहिवासी नागरिकांना या रसत्याच्या कामामुळे अडचणीना सामोरे जावे लागत आहे. रसत्याचे काम सुरु असल्यामुळे दुकानदार व व्यापारी वर्ग यांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. पार्किंग साठी जागा नसल्यामुळे ग्राहक व्यापारी यांच्या दुकाना समोर थांबत नाहीत त्यामुळे दुकानदार व व्यापारी वर्ग यांचे मोठे नुकसान होता आहे. स्थानिक रहिवासी नागरिकांना ये-जा करण्यास नाहक त्रास होते आहे रसत्याचे सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याचे काम कधी पूर्ण होणार असा प्रशन आता स्थानिक रहिवासी नागरिकांच्या समोर उभा राहिल आहे तरी २१ जूनला संत तुकाराम महाराज पालखी आकुर्डी मधे येणार आहे त्या आधी सदर रसत्याचे सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याचे काम पूर्ण करुन आकुर्डी मेन रोड येथील बंद ठेवण्यात आलेले सर्व रस्ते वाहातुकी साठी खुले करण्यात यावे, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.