शबनम न्युज | मुंबई
दर्जेदार रस्ते सुनिश्चित करण्यासाठी मुंबईतील रस्ते बनविण्याच्या कामावर उपग्रहांद्वारे देखरेख ठेवली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच नवीन काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांना एकही खड्डा नसून, त्यांची आयुष्य ३० वर्ष असेल, असेही फडणवीस म्हणाले. ते मुंबई उपनगरासाठी असलेल्या मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. okbet baseball
okbet play
अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात शनिवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मी नागरी संस्थेला उच्च दर्जाचे काम करण्याचे निर्देश दिले आहेत. गुणवत्तेबाबत कोणतेही तडजोड केले जाणार नाही. पूर्वी दर पावसाळ्यात खड्डे भरायची आणि पुढच्या वर्षी ते पुन्हा उगवायचे आता ही समस्या उगवणार नाही.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “मुंबई सुशोभित प्रकल्पांतर्गत दीर्घकालीन प्रकल्पांचा एक भाग म्हणून ६,००० कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. पूर्वी हाच रस्ता दरवर्षी बांधला जायचा. हा व्यवसाय होता, आणि आता होणार नाही. रस्त्याचे काम योग्य प्रकारे केले जात आहे. याची खात्री करण्यासाठी संपूर्ण बाधंकामचा सरकार उपग्रहाद्वारे निरीक्षण करेल.” काही वर्षांपूर्वी मुंबईतील एक रस्ता खोदला असता पृष्ठभागाखाली काहीही नसल्याचे आढळून आले होते, याची आठवणही फडणवीस यांनी करून दिली. त्यामुळे बांधकामावर लक्ष ठेवले जाईल, असे ते म्हणाले. OKBET/a>
okbet baseball