मानिनी फाऊंडेशन चा उपक्रम okbet odds
शबनम न्युज | पिंपरी
आज अमळनेर येथे मानिनी फाऊंडेशन, मंगळग्रह सेवा संस्था यांच्या वतीने महिला शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आले. अमळनेर आणि परिसरातील महिला शेतकऱ्याची लक्षनिय उपस्थिती होती. महिला शेतकऱ्यांचे संघटन जळगाव जिल्ह्यात वेगाने उभा राहत असुन महिलांच्या सहभागाशिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती होणे अशक्य आहे. देशातील महिलांच्या लोकसंख्येनुसार महिला नेतृत्वाची टक्केवारी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये समाधानकारक नाही अशी खंत डॉ भारती चव्हाण यांनी व्यक्त केली.
शेतीमध्ये महिलांचे शारिरीक श्रम फक्त शेतमजुर एवढ्यापुरते मर्यादित असून. शेतीमध्ये महिलांचे अस्तित्व निर्माण होण्याची गरज आहे. शेती प्रक्रिया उद्योग निर्नयकक्षमता आणि अर्थव्यवस्थेमध्ये महिलांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे . प्रतिकूल काळात देशाची अर्थव्यवस्था संतुलित ठेवणाऱ्या शेतीचे उद्योगामध्ये रुपांतर होणेसाठी शेती प्रक्रिया उद्योग विकसित करण्याची गरज आहे. केंद्र शासनाने त्यादृष्टीने धोरणे जाहीर केली असुन महिलांच्या शेती उत्पादक कंपन्या आणि शेती प्रक्रिया उद्योग जिल्हा स्तरीय उभारण्याचे काम मानिनी फाऊंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. शेतकरी महिलांचे संघटन उभारण्याचे काम सुरू आहे अशी माहिती मानिनी फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी आपल्या प्रस्ताविक भाषनामध्ये दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंगळग्रह सेवा संस्था चे अध्यक्ष श्री दिगंबर महाले होते. मानिनी फाऊंडेशन च्या राज्याच्या कोर कमिटी सदस्या डॉ अनिता पाटील आंतरराष्ट्रीय योग तज्ञ उपस्थित होत्या.
जळगाव जिल्हासाठी बांबू लागवड , बांबू प्रोडक्ट आणि बांबू इंडस्ट्री या विषयाची निवड करण्यात आली असून अमळनेर तालुक्यातील 154 गावामध्ये बांबू , सेंद्रिय शेती , शेती प्रक्रिया उद्योग , प्रशिक्षण याविषयी जागृती करण्यासाठी महिला शेतकरी मेळावे घेण्याचे जाहीर करण्यात आले. बांबू प्रोजेक्ट बाबत माहिती देताना खानदेश बांबू् प्रोड्युसर कंपनी चे श्री उमेश सोनार यांनी 100 रोपांपासुन 50000 चे उत्पन्न मिळु शकते असे सांगताना हे उत्पन्न शेतकऱ्यांचा पेन्शन प्लान होऊ शकतो असे प्रतिपादन केले. बांबू पासून सुमारे 100 प्रोडक्टस तयार करण्याचे काम महिलांना देण्याचे नियोजन आहे.
भविष्यात मानिनी फाऊंडेशन च्या सहकार्याने महिलांची बांबू इंडस्ट्री जळगाव जिल्ह्यात उभारण्याचे मानस आहे असे सांगितले.
डॉ पी एन कदम , संकल्प कॉर्पोरेट लिमिटेड चे मॅनॅजिंग डायरेक्टर यांनी नैसर्गिक आणि नुट्रीसिएन आहार आणि औषधौउपचार पद्धतीची माहिती देताना रोजच्या जीवनात महिलांनी स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य कसे जपावे याविषयीचे मार्गदर्शन केले. मानिनी संकल्प हा नवीन ब्रँड जाहीर करताना ” आजीबाई चा बटवा” हा रोज घरात लागणारा ब्रँड जाहीर केला यामधून महिला रोजगार उपलब्ध करण्याची संधी आहे असे सांगितले
श्री दिलीप पाटील यांनी सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करताना शेतीचा पोत सुधारण्याची गरज व्यक्त केली सेंद्रिय उत्पादनाचे आपल्या प्रकृती बाबत चे महत्व सांगताना महिलांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले.
श्री तुषार गोरे , संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी यांनी शेती प्रक्रिया उद्योगाबाबत महिला मार्गदर्शन करून शेतीतुन उद्योग निर्माण करून कच्या मालाचा टिकाऊपणा आणि किंमती स्वतः नियंत्रित करण्याबाबतीची माहिती दिली.
प्रो जयंत शिंदे ब्रँड कन्सलटंट यांनी एखाद्या वस्तूचे ब्रँडिंग केल्या नंतर त्या वस्तू चीओळख बाजारपेठामध्ये कधी वाढते* आणि व्यवसायिक स्वरूप आणुन विक्रीमुल्ये कसे वाढवता येते याबाबतीची संकल्पना स्पष्ट केली. सदर कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील प्रगतशील महिला शेतकरी आणि शेती प्रक्रिया उद्योगातील 15 महिलांचा
” मंगल मानिनी पुरस्कार..2022 ” देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी महिलांना मानिनी फाऊंडेशन च्या वतीने सॅनिटरि नॅपकिनचे वाटप करण्यात आले. okbet esports
कार्यक्रमात मानिनी फाऊंडेशन च्या श्रीमती सोमानी यांच्या कन्या जान्हवी सोमानी हिने योगा मध्ये मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी मानिनी फाऊंडेशनचे कृषिभूषण सतीश काटे, डॉ. दिनेश पाटील, महेश पाटील, संजय पाटील, अतुल पाटील, भारती पाटील, सरला पाटील, छाया पाटील, तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, प्रशासन अधिकारी भरत पाटील यांच्यासह सेवेकरी उपस्थित होते.
वसुंधरा लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी आभार मानले.